शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली:आरवडेत ‘हुसेनवाला डे’च्या आठवणींना उजाळा : १९६५च्या भारत-पाकिस्तान युध्दातील शौर्यगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 20:15 IST

आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देमाजी सैनिकांची उपस्थिती -भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई मांजर्डे न्यूज : आरवडे (ता. तासगाव) येथे ‘हुसेनवाला डे’च्या कार्यक्रमात कर्नल शिवाजी बाबर यांनी आठवणी मांडल्या. यावेळी विविध जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते.

मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे भारतीय लष्करातील सेकंड मराठा काली पांचवीच्या बहादूर आजी-माजी सैनिकांनी मोठ्या जल्लोषात ‘हुसेनवाला डे’ साजरा केला. यावेळी या तुकडीच्या सदस्यांनी जुन्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल शिवाजी बाबर होते, तर कर्नल एन. डी. जानकर प्रमुख पाहुणे होते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ सप्टेंबर १९६५ रोजी लढाई झाली होती. या युद्धात सेकंड मराठा काली पांचवी या सेनेच्या तुकडीने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानच्या सैन्याला पंजाब गुरुदासपूर येथील हुसेनवाला गावात येण्यापासून रोखून परत पाठवले. भारत सरकारने तुकडीच्या या शौर्याची दखल देऊन गौरव केला. त्यामुळे या तुकडीतील आजी, माजी सैनिक ‘हुसेनवाला डे’ साजरा करतात. सांगली जिल्'ात आरवडे येथे पहिल्यांदाच हा विजय दिवस साजरा करण्यात आला

ब्रिटिश काळात सेकंड मराठा बटालियनची स्थापना झाली. यावर्षी आॅगस्टमध्ये या बटालियनला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. या बटालियनला शौर्याचा इतिहास आहे. १९६५ च्या युद्धात कर्नल टी. टी. नोलन यांच्या नेतृत्वाखाली या तुकडीने हुसेनवाला गावात तीन हजार सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. या भारतीय सेनादलच्या तुकडीत फक्त आठशे सैनिक होते. या तुकडीच्या पराक्रमामुळे पाक सैन्याला भारतात पाय ठेवता आला नाही. पण या मोहिमेत भारतीय सैन्यदलाचे कर्नल नोलन व ११ सैनिक शहीद झाले. भारत सरकारने या पराक्रमाची दखल घेत या तुकडीला मानाचे पारितोषिक देऊन गौरविले. त्यामुळे हा दिवस हुसेनवला विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन कॅप्टन लक्ष्मण चव्हाण व कॅप्टन रामहरी राडे यांनी केले. यावेळी कॅप्टन प्रताप शिंदे, कॅप्टन महादेव कदम, कॅप्टन शिवाजी जाधव, कॅप्टन बाबासाहेब माने, कॅप्टन प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी जिल्'ातील ३०० हून अधिक माजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूतब्बल ३० ते ४० वर्षांनंतर काही निवृत्त सैनिकांची भेट झाली. एकमेकांना अलिंगन देताना त्यांना गहिवरून आले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले होते. काही निवृत्त सैनिकांची दुसरी व तिसरी पिढीही सैन्य दलात दाखल झाली आहे. अनेकांनी भारतीय सेवेत असताना १९६२ च्या चीन युद्धातील, तर १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील, तसेच १९९९ च्या कारगिल युद्धातील थरारक प्रसंग सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात बाहेर गावाहून आलेल्या माजी सैनिकांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.